Posts

गोरगरीब काबाड कष्टकरी माणसांच्या घरांची वस्ती,बिल्डर-माननीय-प्रशासन मनपा आली मस्ती.

गोरगरीब काबाड कष्टकरी माणसांच्या घरांची वस्ती, बिल्डर-माननीय-प्रशासन मनपा आली मस्ती. भारताच्या सुसंस्कृतीत  वटपौर्णिमेच्या दिवशी आंबील ओढा या ठिकाणी झालेल्या कारवाईचा जाहीर निषेध करून लेखाला सुरुवात करत आहे.  गंगेचा उगम गंगोत्री याठिकाणी झाला असला तरी नदी गंगा मुळे जमीन  सुपीक होऊन सर्व पिक घेतल्यामुळे मानवाच्या प्रगतीमध्ये गंगेला अमूल्य महत्त्व आहे. अनेक उद्योगधंदे, ऊर्जा प्रकल्प पाणी उपलब्ध असल्यामुळे उभारले आणि लोकवस्ती ही वाढली. पुणे हे मुळा, मुठा नदीवर वसलेले शहर आहे. पाणी,ऊर्जा आणि सुपीक जमीन असल्यामुळे पुणे शहराची भरभराटी झाली. शहरीकरण वाढल्यामुळे पुण्यात दिवसेंदिवस राहण्याचा प्रश्न कठीण होत गेला लोकांना मिळेल तिथं आसरा घेऊ लागले. त्यातून नंतर भाईगिरी,वसाहतवाद,भांडण निर्माण झाले. आंबील ओढ्याचा पाच एकरचा भूखंड बाजार भाव तीनशे कोटी रुपये असल्यामुळे याकडे सर्वांच्या नजरा वळल्या. त्याच्या शेजारून ओढा वाहत असल्यामुळे त्याला आंबील ओढा असे नामकरण करण्यात आले. कष्टकऱ्यांची वसाहत असलेल्या या ठिकाणी एस आर ए प्रकल्प उभा करून मोठा फायदा कसा घेता येईल यादृष्टीने सर्व बिल्डर मंड...

सोशल मीडिया सर्वात प्रभावी माध्यम - महेश म्हात्रे

Image
पुणे-  लोकसभा,विधानसभा निवडणुकीपासून ग्रामपंचायत निवडणुकीपर्यत सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरत आहे.त्यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि नेते सोशल मीडियाकडे वळले आहेत.यातू...

पेट्रोलडिझेल ग्राहकांची लूट

Image
पेट्रोल-डिझेल या दुभत्या गायींकडून जास्तीत जास्त कररूपी दूध मिळवण्याचा प्रयत्न सातत्याने केंद्र व राज्य सरकार करत आहेत. एकीकडे "जीएसटी' आल्यावर कर कमी झाले, तर व्यापार...

साध्या-सभ्य मुलाशी लग्न करा.

Image
 लग्नाच्या वयात आलेल्या मुलींसाठी एक महत्त्वाचा सल्ला आहे. जर तुम्ही लाईफमध्ये सेकंड इनिंगचा विचार करत आहात तर थांबा. स्टाईलिश आणि स्मार्ट मुलाच्या मागे जाऊ नका तर साधा सरळ मुलगा शोधा. हा सल्ला कोणी सर्वसामान्य स्त्रीने दिला नसून फेसबुकची मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीओओ शेरील सॅण्डबर्ग यांनी दिला आहे. फेसबुकच्या आजच्या यशात शेरीलचा वाटा सिंहीणीचा आहेच. शेरील अनेक ठिकाणी मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून बोलते, जगण्याचा एक वेगळा आणि आनंदी दृष्टीकोन जगभरातल्या माणसांशी शेअर करते. अलिकडेच फिनान्शियल टाईम्स वृत्तपत्राला अमेरिकेतच दिलेल्या मुलाखतीत ती मोकळेपणाने बोलत होती. मुलींनी लग्नाचा निर्णय घेताना फार काळजीपूर्वक विचार करुन ‘the good guy’ शोधायला हवा. जगण्याची लढाई स्वत:च्या हिमतीवर जगणाऱ्या आणि आयुष्याच्या प्लॅन बीचा जिद्दीनं, आनंदानं स्वीकार करणाऱ्या शेरील सॅण्डबर्गचा हा सल्ला आहे. नात्यात, विशेषत: लग्न करताना एखाद्या मुलीनं काय विचार करायला हवा असा प्रश्न विचारला असता शेरील सांगते, पहायला हवं की हा माणूस चांगला आहे की नाही, जन्मभर आपली सोबत करताना आपल्या आनंदात आनंद मानेल की नाही....

पत्रकार ते रिपब्लिक टीव्ही...

Image
अर्णब गोस्वामी यांचा 'रिपब्लिक टीव्ही' ऑन एअर आक्रमक आणि धारदार सूत्रसंचालनाच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी शनिवारी माध्यमविश्वात पुनर...

आरक्षण आणि दिशाभूल.

Image
आरक्षण समाजातील विविध घटकांची प्रगती झाली.  काही प्रश्न निर्माण झाले? १.पूर्वी प्रमाणे आरक्षण आसवे का? २.सशक्त समाज घटकांना आरक्षणतुन      वगळावे का? ३.आधुनिक आरक्षण रचन...

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Image
पवित्र देशा, मंगल देशा, महाराष्ट्र देशा! महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!,  महाराष्ट्र राज्य म्हणजे मराठी भाषेचे राज्य. हे राज्य व्हावे ही इथल्या जनतादनार्दनाची फार वर्षांपासून इच्छा होती. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच भाषावर प्रांतरचनेचे महत्त्व महात्मा गांधींपासून सर्वांनी आग्रहाने प्रतिपादित केले होते. पुढे राज्य पुनर्रचनेचे महत्त्व महात्मा गांधींपासून सर्वांनी आग्रहाने प्रतिपादित केले होते. पुढे राज्य पुनर्रचनेतून निर्माण झालेल्या असंतोषात महाराष्ट्राचे एकशे पाच हुतात्मे बळी पडले. नकाशा पुढे पाहता भारताचा, महाराष्ट्र आधी भरे लोचनी अशी महाराष्ट्राची महती कवी यशवंतांनी गायिली आहे. तर महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेलें, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले, अशी अभिमानाची ग्वाही सेनापती बापटांनी दिली आहे. मराठी भाषेचे राज्य आल्यावर आपल्या मातृभाषेला चांगले दिवस येतील, अशी केवळ अपेक्षाच नव्हे, तर खात्री मराठी जनतेला वाटत होती. पारतंत्र्याच्या काळात, नसे आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे, असे भावपूर्ण स्वप्न माधव ज्यूलियन यांनी शब्दबद्ध केले ह...